सामान्यकाळातील २०वा सप्ताह
गुरुवार २१ ऑगस्ट २०२५
कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडेच आहेत."
For many are called, but few are chosen.
परमगुरू, वर्तनसाक्षी (१८३५-१९१४)
मत्तय २२:१-१४
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जितके तुम्हांला आढळतील तितक्यांला लग्नाच्या मेजवानीस बोलवा. "
मुख्य याजक आणि वडीलजन यांच्याशी दाखले देऊन येशू बोलू लागला : “स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाच्या मेजवानी दिली आणि त्या लग्नाच्या मेजवानीचे ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठवले. परंतु ते येईनात पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले आणि त्यांना म्हटले की आमंत्रितांना असे सांग, 'पाहा, मी जेवण तयार केले आहे,माझे बैल आणि पुष्ट पशू कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीला चला.' तरी हे मनावर न घेता कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला आणि त्यांना जिवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासांना म्हणाला, “लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हांला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा." मग त्या दासांनी रस्त्यांवर जाऊन बरेवाईट असे जितके त्यांना आढळले त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप जेवणाऱ्यांनी भरून गेला."
"मग राजा जेवणाऱ्यांना पाहायला आत आला, तेव्हा लग्नाचा पोषाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोषाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांस सांगितले, ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडेच आहेत."