सामान्य काळातील
चोविसावे रविवार
१२ सप्टेंबर २०२१
शुभवर्तमान मार्क ८:२७-३५
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी हे अटळ आहे."
येशू आणि त्याचे शिष्य फिलिप्पीमधील कैसरियाच्या आसपास असलेल्या खेड्यापाड्यांत जायला निघाले, तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात ?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “स्नानसंस्कार करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक संदेष्ट्यांतील एक असे म्हणतात.” तेव्हा त्याने त्यांना विचारले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?” पेत्र त्याला उत्तर देऊन म्हणाला, “आपण ख्रिस्त आहा.” तेव्हा माझ्याविषयी कोणाला सांगू नका अशी त्याने ताकीद दिली.
तो त्यांना असे शिक्षण देऊ लागला की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडीलजन, मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि त्याने तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे, हे अटळ आहे. ही गोष्ट तो उघड बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन ते नाकारू लागला. तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो पेत्रला स्पष्ट म्हणाला, "सैताना, माझ्यापुढून चालता हो, कारण तुझा दृष्टिकोन परमेश्वराचा नव्हे तर मनुष्याचा आहे.”

0 टिप्पण्या